Thursday 28 June 2018

वऱ्हाडींना भेट सैंद्रिय बियाण्याची !

            आज मानव निसर्गावर विजय मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःची आणि निसर्गाची देखील मोठ्या प्रमाणवर हानी करत आहे. विविध पर्यावरणीय समस्या निर्माण होण्यासाठी आपण बऱ्याच वेळेला निसर्गाला दोषी ठरवतो. मात्र या पर्यावरणीय समस्यांना मानवी भोगवादी वृत्ती, हाव आणि आक्रमकता कारणीभूत आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडून मानवाने आपला विकास घडवून आणला खरा मात्र त्याची परतफेड करायला तो विसरला.
                  पण आपल्या सभोवताली काही अशीही माणसे असतात जी निसर्गाचे ऋण फेडण्यासाठी क्रियाशील असतात. त्यातीलच एक असलेले स्वामी दांपत्य. श्री.नागेश स्वामी व त्यांच्या पत्नी सौ.भारती स्वामी यांनी उंब्रज जवळील शिवडे या गावी सैंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी रित्या उभारला आहे. मला काही वर्षांपूर्वी शिवडे गावाला भेट देण्याची संधी मिळाली. ( तेथील अनुभवावर मी स्वतंत्र लेख लिहलेला आहे. लवकरच तो क्रमशः प्रकशित करेन.) मानव व निसर्ग एकमेकांशी जोडले जावेत असे या सैंद्रिय शेतीचे प्रयोजन केलेले आहे. ते पाहून निसर्गाचे ऋण फेडायला आपला सुद्धा हातभार लागावा असे वाटत होते. एक वर्षापूर्वी माझ्या आत्तेबहिणीच्या लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आपण विविध सैंद्रिय भाज्यांचे बियाणे द्यावे अशी कल्पना माझ्या डोक्यात आली.
                   भारती काकूंची स्वतःची बीज बँक आहे. बीज बँक म्हणजे विविध बियांचा संग्रह. त्यांच्याकडे विविध देशी-गावरान बियांचा संग्रह आहे. त्यांसाठी त्या भारत-पाक सीमा ते खाली दक्षिणेपर्यंत जाऊन आल्यात. देशी बियांचे संवर्धन व जतन व्हावे ही त्यांच्या बीज बँकेची उद्दिष्टे. या बीज बँकेत भेंडीचे दोन- तीन प्रकार, घेवड्याचे विविध प्रकार, करटूले, हळद, आंबट-सुका, हदगा, दुधी भोपळा, शेवगा, घोसावळे, हिरडा बेहरडा या औषधी वनस्पती तसेच अनेक दुर्मिळ बियांचा संग्रह आहे. यातील काही निवडक बियाणे लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना देऊन बीज संवर्धनासाठी हातभार लावण्याची कल्पना मी काकूंना बोलून दाखवली त्यांनी सुद्धा तत्काळ होकार देवून माफक दरामध्ये मला हादगा, आंबट-सुका, घोसावळी, दुधी भोपळा, शेवग्याचे बियाणे उपलब्ध करून दिले. विवाह समारंभाला आलेल्या ४०० वऱ्हाडींना आम्ही हे बियाणे भेट दिले. आणि काही दिवसातच त्याचा सकारात्मक प्रतिसाद देखील मिळला. "अगं तू दिलेल्या आंबट-सुक्याची आम्ही चार वेळा भाजी करून खाल्ली, हादग्याला  फुलं येयला सुरवात झालीये, घोसावळ्याचा वेल बराच फुलाय आत्ता....) असं अनेक नातेवाईक भेटल्यावर सांगतात. बऱ्याच जणांना घरातील ओला कचरा या भाज्यांच्या रोपांना वापरल्यामुळे ओल्या कचऱ्याचे निर्मूलन होयला देखील मदत झाली.
               आरोग्याच्या द्रुष्टीने आपल्या भोजनात सैंद्रिय भाज्यांचा समावेश असणे गरजेचे आहे. माझ्या छोट्याश्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळालय. असे काही हितकारक ट्रेंड झाल्यास मानव व निसर्ग यांचे नाते घट्ट होयला वेळ लागणार नाही. कारण आपल्याला निसर्गावर विजय मिळवायचा नसून त्याच्या साथीत, त्याच्या साखळीतला एक दुवा म्हणून जगायचं....

       मुक्ताफळ
( कु. मुक्ता भारत शिंदे.)

जुनं ते सोनं : इतिहासाचा मौल्यवान खजिना

            काल बाथरूममधून पाणी पुढे जात नव्हतं. पाणी कुठे तरी chock up झालं असणार.. ड्रेनेज क्लीनिंग पावडर टाकून वैगेरे हा प्रश्न सुटेल असं...